"अडगुलं मडगुलं.." पासून जी कविता मुलांच्या आयुष्यात शिरते, ती पुढे "खबडक खबडक..." करत शालेय पाठ्यपुस्तकांकडे जाऊन थांबते. "हिरवे हिरवे गार गालिचे.." क्वचितच एखाद्या मनाला गारवा देताना दिसतात. असं का होत असावं बरं...?
कविता ही बालवयातच उकलून दाखवली, किंवा चुकून आपोआप एखाद्याला उमगली, तरच ती पुढे "मनाच्या धुंदीत लहरीत.." राज्य करू लागते.
आपल्या भाषेची ही सौंदर्यस्थळं आपणच पुढच्या पिढीला बोट धरून दाखवली पाहिजेत!
चला तर मग! हसत खेळत मुलांना मुलांच्या भाषेत कवितांचं तंत्र, त्यातलं मर्म, त्यातली गोष्ट, संगीत समजावून देणारा हा 'क - कवितेचा' गिरविलाच पाहिजे!